बेलापूरचा किल्ला

मुंबईजवळील मध्ययुगीन किनारी किल्ला

बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजमराठा साम्राज्यात होता. १९व्या शतकाच्या पुर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या सीबीडी बेलापूर ह्या रेल्वे स्थानकापासून २.५ किमी लांब आहे. सध्या ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे.


बेलापूरचा किल्ला

बेलापूरचा किल्ला
गुणक 19°00′20″N 73°01′42″E / 19.005524°N 73.028403°E / 19.005524; 73.028403
नाव बेलापूरचा किल्ला
उंची २७ मी (८९ फूट)
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नवी मुंबई
जवळचे गाव बेलापूर
डोंगररांग नाही
सध्याची अवस्था दुरावस्था
स्थापना १५७०


इतिहास संपादन

इ. स. १५६० ते १५७० मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला, तेव्हा सिद्दींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ, एका टेकडीच्या माथ्यावर बांधला. १६८२ मध्ये, हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्दींनी नियंत्रित केलेल्या बेलापूरजवळील प्रदेशांना (त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे) त्यांनी ताब्यात घेतले.

१७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने २३ जून १८१७ रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला.

त्याच्या सक्रिय दिवसांमध्ये, किल्ल्यात चार तुकड्या प्रत्येकी १८० माणसांच्या आणि ४-१२ पाउंड (२-५ किलो) वजनाच्या १४ बंदुका ठेवल्या होत्या. ह्या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बेटाशी जोडले गेला आहे, जे एलिफंटा लेण्यांचे ठिकाण आहे.

जतन व संवर्धन संपादन

 
बेलापूरचा किल्ल्याचा बुरुज