मंगोल योध्यांनी मिळवलेला सर्वोच्च विजय. कोणत्याही इस्लामी राजवटीचा आजवरचा सर्वात दारुण पराभव. चंगीजखानचा नातू हुलागु खान याने इस १२५८ मध्ये बगदादला त्याने वेढा दिला. बगदादवासीयांचे हाल केले. शेवटी बगदादमध्ये घुसून बगदादमधील सर्व रहिवाश्यांची कत्तल केली. सर्व बगदाद जाळून खाक करण्यात आले. बगदादच्या पाडावानंतर इस्लामचे सुवर्णयुग संपुष्टात आल्याचे मानण्यात येते.