दीवाण बहाद्दूर नेमिलि पट्टाभि रामाराव पंत (बी.ए.) हे एक स्वातंत्र्यसेनानी आणि कोची संस्थानाचे एक भूतपूर्व दीवाण होते.

पूर्वेतिहास संपादन

पट्टाभि रामाराव १९६२ मध्ये कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवटम्‌मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मले. ह्यांचे पिताश्री रामानुजराव पंत तेंव्हा कडप्पा जिल्ह्यामध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत होते. कडप्पातील पाठशाळेमध्ये विद्याभ्यासपूर्ति करून पट्टाभि रामाराव मद्रासमध्ये प्रेसिडन्सी कलाशाळेमध्ये भरती झाले. 1882 मध्ये मद्रास विश्वविद्यालयातून बी.ए. डिग्रीसह मदनपल्लीमध्ये सब्‌कलेक्टर कार्यालयामध्ये गुमास्ता म्हणून उद्योग जीविताला प्रारंभ केले.

उद्योग जीवित संपादन

15 एप्रिल 1882ला पट्टाभि रामाराव चित्तूर जिल्ह्यातून ‘मद्रास राष्ट्र रेविन्यू सेटिल्‌मेट् शाखे’मध्ये उद्योगी म्हणून जीवित प्रारंभिले. 1895मध्ये असिस्टंट कमीषनर म्हणून स्थायि झाले. 1888 मध्ये त्यांनी दक्षिण आर्काटमध्ये सूपरवायजर म्हणून कार्य केले. त्यानंतर 1892मध्ये त्यांची मलबारला बदली होवून तिथे अन्‌कवेनेंटेड् असिस्टंट म्हणून कार्य केले. तीन वर्षांनंतर असिस्टंट कमीश्नर म्हणून, आणि त्यानंतर डिप्युटी कमीश्नर म्हणून पदवोन्नति पावले. डिप्यूटी कमीश्नर हुद्द्यावर गोदावरि, अनंतपुरम्, कृष्णा ह्या जिल्ह्यांमध्ये कार्य केले. कोची संस्थानामध्ये रेविन्यू सेटल्‌मेंट् व्यवस्थेचे संस्करण करण्याकरिता, त्या विषयामध्ये अनुभवसंपन्न असलेल्या पट्टाभि रामारावांना कोची संस्थानप्रभुने दीवाण म्हणून नियुक्तले. 1902 पासून 1907 पर्यंत तेथे दीवाण म्हणून कार्य करून पट्टाभि रामाराव भूमि दस्तावेज कार्यालयाचे क्रमीकरण निर्वाहण्याच्या चर्येमध्ये प्रवेश करते झाले. 1908 मध्ये उद्योग जीवितातून निवृत्त झाले. तेंव्हा रु. 350/- उद्योगनिवृत्ती भत्त्यासह पदवी निवृत्त झाले.

पदवी निवृत्तीनंतर प्रजासेवेमध्ये संपादन

पदवी निवृत्तीनंतर पट्टाभि रामाराव मद्रासमध्ये पूनमल्लि हाय रोडवर ‘श्रीराम ब्रिक् वर्क्स्’ म्हणून एक वीटभट्टी स्थापून शंभर-एक कार्मिकांना कार्य देते झाले. ह्या कर्मागारामध्ये 30-40 लक्ष विटा तयार होत. स्वतःच्या व्यापार निर्वहनासह ह्यांनी आदोनि गांवामध्ये वेस्टर्न कॉटन कंपनी आणि उन्निदारं ऐगुमतिचेसे मद्रास यार्न कंपनी निर्वहनामध्ये भाग घेतला. तेलुगु अकादमी, भारतीय अधिकारी संघ, केंद्र व्यवसाय कमिटी इत्यादीमध्ये कार्यदर्शि म्हणून कार्य करत प्रजासेवेमध्ये भाग घेतला. म्हातारपणात मदनपल्लीमध्ये स्थायिक होवून सब डिविजन संघाची अध्यक्षता वाहत, त्याच्या कार्यक्रमांना पूर्ण समय दिला. ते स्वखर्चाने विविध गावांना पर्यटन करून, सामान्य प्रजेच्या उद्धरणाकरिता सूचना देत असत.

स्वतंत्र आंध्रराज्यनिर्मितीकरिता प्रयत्न संपादन

पूर्वी स्वतंत्र आंध्रराज्यनिर्मितीकरिता प्रयत्न करावयास उत्सुकता न दाखवलेले, तदनंतर मन पालटून त्यांनी स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या प्रयत्नांना सहाय्य केले. ह्यांनी 1918 मध्ये कडप्पामध्ये झालेल्या आंध्रमहासभेचे अध्यक्षपद भूषविले.

मृत्यु संपादन

पट्टाभि रामाराव वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धाप्य कारणाने 15 ऑक्टोबर 1937 ह्या दिनी मद्रासमध्ये स्वगृहामध्ये मरण पावले.