जे जळण भुरुभुरु जळून जाते, ज्यातून अन्न शिजवण्यासाठी ताव येत नाही म्हणजेच पुरेशी उष्णता येत नाही अशा बारीक काड्याकाटक्यांना धसट म्हंटले जाते. हे धसट भुरुभुरु जळून जात असले तरी पटकन पेट घेते म्हणून चूल पेटवताना सुरुवातीला त्याचा वापर करतात. धसट म्हणजे बारीक काड्या वाळलेलं गवत असे चुलीत आधी घातले कि फाटा पेटण्यास मदत होते.