दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना

दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. गरीब लोकांना कौशल्याधरित प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी भारत सरकारने एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.आजीविका या योजनेऐवजी ही योजना आणण्यात आलेली आहे.

या योजनेद्वारे सन २०१६ पासून ते सन २०१७ पर्यंत शहरी भागांतील पन्नास हजार तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण आवश्यक त्या आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे दिले जाईल.[१][२]


संदर्भ संपादन

  1. ^ दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना विमोचित
  2. ^ [१] शहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेची घोषणा केली