दिगंबर भालचंद्र ऊर्फ मामासाहेब घुमरे ( नागपूर, ९ नोव्हेंबर १९२७) हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि लेखक आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इ.स. १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान घुमरे यांच्या 'नागपूर तरुण भारत' या वृृत्तपत्राला सरकारने त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मामासाहेब घुमऱ्यांनी न डगमगता आपले वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचविले आणि विस्तार पण केला.

दि.भा. घुमरे हे बी.ए. एल.एल.बी असून त्यांनी हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेत १९५६ ते १९६१ या काळात नोकरी केली. त्यानंतर सन १९५७ सालपासून ते नागपूरच्या 'दैनिक तरुण भारत' या वृत्तपत्रात आधी संपादक, व सन १९८३पासून मुख्य संपादक झाले. ९ नोव्हेंबर १९८७ रोजी ते निवृृत्त झाले. त्यांच्या पत्नीचे नाव मालती आणि दोन मुली सौ. वृंदा घोलप, सौ. नीला क्षिरसागर व दोन मुले श्री. राजीव घुमरे आणि श्री. मिलिंद घुमरे असा त्यांचा परिवार. मामांचे मुलं सुना आणि नातवंड हे पण समाजकार्यात सक्रिय आहे.

दि.भा. घुमरे हे सन १९७४ ते २००५ या काळात छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, व १९८८ ते २००३ या काळात विश्व हिंदू परिषद (विदर्भ प्रदेश)चे उपाध्यक्ष होते.[१]

दि.भा. घुमरे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र (ॲड. नाना अभ्यंकर यांनी लिहिलेल्या बृहत चरित्राची लघु आवृत्ती)
  • आन्हिक
  • प्रासंगिक
  • प्रेषितांचा काळ
  • बकुळीची फुले
  • पंडित बच्छराजजी व्यास : व्यक्ती आणि कार्य (चरित्र, सहलेखक - डाॅ. कुमार शास्त्री)
  • रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन[१]
  • चिरंतनाचे योगी विनोबा
  • विरंगुळा
  • शंखशिंपले
  • श्रीगुरुजी के प्रेरक संस्मरण (हिंदी, संकलन)

पुरस्कार संपादन

  • सरोजिनी अकॅडमीतर्फे दिला जाणारा 'कमलकांता' पुरस्कार (२०१८)
  • ग्रंथालय भारतीकडून दिला जाणारा माहर्षी व्यास पुरस्कार (मे २०१७)

संदर्भ संपादन

  1. ^ a b Ghumre, Shri D. B. (2010-07-25). Ramjanmabhoomi Muktiche Andolan / Nachiket Prakashan: रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन. Nachiket Prakashan. p. 4. ISBN 9789380232249.