खोवाई हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक शहर आहे. खोवाई जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर खोवाई नदीच्या काठावर वसले आहे. हे शहर बांगलादेश सीमेजवळ असून संपूर्ण दक्षिणेस बांगलादेशच्या सीमा आहेत.

वस्तीविभागणी संपादन

 
कोहिनूर कॉम्प्लेक्समधून शुभाश पार्कचे दृश्य

२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [१] खोवाईची लोकसंख्या १७,६२१ होती. लोकसंख्येच्या ५१% पुरुष आणि ५९% स्त्रिया आहेत. खोवाईचा सरासरी साक्षरता दर ८६% आहे.

वाहतूक संपादन

येथील खोवाई विमानतळ सध्या कार्यरत नाही. [२]

संदर्भ संपादन

  1. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Unused Airports in India". Center For Asia Pacific Aviation. 27 November 2009. 9 February 2012 रोजी पाहिले.