क्रांतिवीर खाज्या नाईक सातपुडा प्रदेश भिल् आदिवासी नायक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य ते करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या गोंड भिल पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.१८५५ला शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे असे त्यांना वाटत होते पण तेव्हा १८५७ क्रांतीचे वातावरण तापू लागले होते तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. देशात कोणी इंग्रजांना विरुद्ध कोणी उभे राहू शकत नाही होते तेंव्हा त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक धावून आले होते, त्यांनी २२००-२५०० आदिवासींनी जमा करून ब्रिटिश वसाहती व खजिना लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन उभे केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल् येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये क्रांतिकारी ज्योत आणि ब्रिटिशाच्या मनात दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर परिसरावर कब्जा करून उत्तर व दक्षिण भारत अशी ब्रिटीश रसद रोखली व ब्रिटीशांच्या ऐवजी नियंत्रण मिळवून स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली. होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेली खंडणी खजिना मुंबईला जात होता तो क्रांतिवीर खाज्या नाईकांनी लुटला, ती रक्कम जवळ जवळ ७०,००,००० रुपये होती, व त्याचे रक्षण १५०० सैनिक करीत होते पण त्यांनी क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या भिल आणि गोंड आदिवासीं क्रांतिकारकांना विरोध न करता शरणागती पत्करली. हा एव्हढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर क्रांतिवीर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर भारतात सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली. क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक असेही येऊन मिळाले, तापी नर्मदा खोरे, सातपुडा व विंद्य सातपुडा पर्वत, अक्राणी महाल, निमाड़, मारवा मेवासी पूर्ण सातपुडा प्रदेश मध्ये आदिवासीं क्रांतीचा वणवा पेटला अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले क्रांतीकारी काळूबाबा नाईक ही आता क्रांतिवीर खाज्या नाईकना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य तसेच बरोडा गायकवाड संस्थानातील गावीत, मावची, चोधरी आदिवासीं सैनिक व अधिकारी , काठी, गंगठा, संस्थानातील तडवी, पाडवी, आदिवासी सैनिक और रायंगन चे ठिंगळे भील शेवटचे मराठा सरदार खाज्यांना येऊन मिळाले. आता आदिवासी सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, "सुलतानपुरच्या" आदिवासीं सेनेने " सारंगखेडा " ब्रिटिशाविरुद्ध हल्ला चढविला रायंगनचे ठिंगळे सरदार यांनी सोनगडवर तसेच त्यांचे वसावे आदिवासी सेनापती यांनी रायकोट किला येथे हल्ला चढविला रायंगनचे ठिंगळे सरदार यांनी थेट सुरतेवर चढाई केली पण त्यांना ब्रिटीश फोजनी सोनगडवर रोखले गायकावडी सेना ब्रिटीश विरुद्ध न झाल्याने ठिंगळे सरदार यांना अनेक सेनिक गमवावे लागले पण भिलानी ब्रिटिशांना व ब्रिटीश राजेशाही यांना सळो की पळो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते. आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले होते. ब्रिटीश सैनिकांच्या पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकाही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर आदिवासी भिल् क्रांतिकारी सोबत लढण्या साठी महाराष्ट्तील खानदेशातील महादेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. महादेव कोळी ब्रिटीश सैनिकांमार्फत आदिवासींनी जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्सला क्रांतिवीर खाज्या नाईक व त्याचे ३०,००० क्रांतिकारी भिल् साथीदार हे बडवानी आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी गाफील घेराव टाकला. तरी पण शरण येतील ते आदिवासी कसले त्यांनी जवळ असलेल्या तिर धाऱ्या भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रिटिशांच्या तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा जास्त टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व १८०० सैनिक मारले. आदिवासी ची ही हानी झाली. २४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा " पोलाद्सिंग" हा 'शहीद' झाला. पकडलेल्या कैद्यान्पेकी १५०० पेक्षा आधिक कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून ठार मारण्यात आले. क्रांतिवीर खाज्या नाईक यांनी आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुले येतील कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले. हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ला आदिवासीं प्रदेश मधील नीमाड पाटी तील शिरपूरला ब्रिटीश खजिना लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल् होते. १७/११/१८५७ साली परत क्रांतिवीर खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७,००,०००चा ब्रिटीशांचा खजिना लुटला. दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह २५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने तळोदा जवळ आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात १६५० लोक मारले गेले. क्रांतिवीर खाज्या नाईक सह १५७० लोकांना ड्रमच्या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लात्कावण्यात आले कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४०० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील " आम्बापानीची लढाई " म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते,