काक्चिंग हे भारताच्या मणिपूर राज्याच्या आग्नेय भागातील एक शहर आहे. हे काक्चिंग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि राज्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाने काक्चिंगला ईशान्य भारतातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे जाहीर केले. [१] [२] [३] [४] [५]

भूगोल संपादन

 
काक्चिंगचे दृश्य

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार, काक्चिंगची लोकसंख्या ३२,१३८ होती, त्यांपैकी १५,७१० पुरुष आणि १६,४२८ महिला होत्या. येथील साक्षरता दर ८३.०८% होता. [६]

विमानतळ संपादन

दुस-या महायुद्धादरम्यान आणि भारतीय राष्ट्रीय सैन्य आणि त्याच्या मित्रपक्षांविरुद्धच्या मोहिमांचा एक भाग म्हणून, भारतातील ब्रिटिश सरकारने काक्चिंगमध्ये एक विमानतळ बांधला होता. येथून ब्रिटिश सैन्याला आवश्यक शस्त्रे, दारूगोळा आणि अन्न पुरवले जात. आज ही जागा आसाम रायफल्सच्या ताब्यात आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी ती अंशतः भातशेतीत बदलली आहे. विमानतळाच्या सभोवतालच्या लहान टेकड्यांमध्ये आणि आजूबाजूला अजूनही हँगर साइट्स आहेत. येथे जमिनीची मशागत करताना शेतकऱ्यांना तेथे न फुटलेले बॉम्ब सापडतात.

भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांनी येथून विमानाने उड्डाण केल्यावर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा समज आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Kakching named cleanest town in NE". Archived from the original on 2018-05-19. 2023-09-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Kakching named cleanest town in NE – Manipur News".
  3. ^ "Kakching Named the Cleanest Town in Northeast India". Archived from the original on 2020-04-07. 2023-09-15 रोजी पाहिले.
  4. ^ NEWS, NE NOW (18 May 2018). "Manipur town adjudged cleanest in northeast region". NORTHEAST NOW.
  5. ^ "Manipur town declared cleanest". Archived from the original on 2018-11-30. 2023-09-15 रोजी पाहिले.
  6. ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.