कवी कुंजविहारी

एक मराठी कवी

हरिहर गुरुनाथ सलगरकर कुलकर्णी तथा कवी कुंजविहारी (१८९६-१९८१) हे एक मराठी कवी होते.


पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [१]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.

कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.