ओतूर हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. [१] या गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथून अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदिर ८ किलोमीटरवर आहे. शिवनेरी किल्ला ओतूरहून २० किलोमीटर दूर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे. ओतूरपासून जवळ डुंबरवाडी व खामुंडीच्या शीवेवर सोमनाथाचे प्राचीन देउळ आहे.

कपर्दिकेश्वराचे मंदिर संपादन

कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या मांडवी नदीत ते धुऊन घेतले जातात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्‌भुत समजली जाते. दर सोमवारी पिडींची संख्या वाढत जाते.

यात्रेच्या दिवशी इनामी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात यासाठी राज्यभरातून मल्ल ओतूरला येतात.

प्रसिद्ध व्यक्ती संपादन

  • संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज

ओतूर येथे, संत तुकाराम महाराजांचे गुरू[२] असलेले काशी क्षेत्रीचे ब्राह्मण संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज, हे त्या काळच्या उत्तमापूर (सध्याचे ओतूर) येथील मांडवी नदीच्या तीरी कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात सन १५७१ मध्ये, म्हणजे ४४० वर्षांपूर्वी समाधिस्त झाले होते.[३]

श्री चैतन्य महाराजांनी समाधीनंतर साठ वर्षांनी, देहूच्या तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन उत्तमापुरीस भेटीस बोलावले व राम-कृष्ण-हरी हा मंत्र देऊन वारकरी पंथाची पताका घेऊन पंथाचा प्रचार महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कृपेमुळे श्रीसंत तुकाराम महाराजांना संत शिरोमणी जगदगुरू ही ख्याती मिळवून दिल्याची कथा सांगितली जाते.[४]

  • अनिल अवचट

मराठी पत्रकार व साहित्यिक अनिल अवचट यांचे हे जन्मगाव आहे.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांचे हे आजोळ आहे. प्रसिद्ध साहित्यिक अनिल अवचट व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका अनिता अवचट यांच्या त्या सुकन्या आहेत.

शैक्षणिक संस्था संपादन

  • चैतन्य विद्यालय
  • सावित्रीबाई फुले कन्या शाळा
  • श्री गाडगे महाराज संस्थानचे गाडगे महाराज विद्यालय
  • अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय
  • शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय
  • शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालय

शेती संपादन

ओतूर गावाच्या परिसरात आधुनिक पद्धतीने कांद्याचे उत्पादन आणि साठवणूक केली जाते. केळी, ऊस इत्यादी बागायती पिके घेतली जातात. येथे पंचायत समितीचा बाजार असून २५ किलोमीटर परिसरातील शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी येथे येतात.

पुस्तके संपादन

ओतूर गावाची माहिती अनेक मराठी पुस्तकांत आली आहे; त्यांपैकी काही प्रसिद्ध पुस्तके अशी:-

  • एक होतं गाव (सुधाकर घोडेकर, पुरंदरे प्रकाशन)
  • चैतन्य चरित्र- वामनराव ओतूरकर

संदर्भ संपादन

  1. ^ दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी[permanent dead link] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले
  2. ^ दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जसे दिसले
  3. ^ दैनिक लोक्सत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी[permanent dead link] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले
  4. ^ दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी[permanent dead link] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले