सतराव्या शतकाच्या मध्यावर इंग्रज आणि डच यांच्यात व्यापारी स्पर्धा सुरू झाली, ही व्यापारी स्पर्धा म्हणजेच इंग्रज-डच स्पर्धा होय. ही व्यापारी स्पर्धा ६० ते ७० वर्षे चालली. या स्पर्धेमुळे अठराव्या शतकाच्या सुरुवातीस डचांची भारतातील सत्ता घसरू लागली. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी १७५९ मध्ये बंदेराच्या लढाईत त्यांचा पराभव घडवून आणला. या लढाईनंतर १७९५ पर्यंत इंग्रजांनी डचांना भारतातून हद्दपार केले.[ संदर्भ हवा ]