अक्काबाईंनी ३५ वर्षे समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला शिवाय समर्थांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जन्गाडचा कारभार सांभाळला. १२ व्या वर्षापासून ८५ वर्षांपर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झाल्या.औरंगजेबाच्या आक्रमणाच्यावेळी अक्काबाई यांनी गडावरील राम पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली. त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. त्यांना अक्कास्वामी असे म्हटले जाई.