अलीवाल हे भारताच्या पंजाब राज्यातील तरण तारण जिल्ह्यात असलेले गाव आहे. या गावाजवळ सतलज नदीकाठी २८ जानेवारी, इ.स. १८४६ रोजी अलीवालची लढाई झाली. यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला होता.

भारताच्या फाळणीदरम्यान अलीवालमधील बहुसंख्य असलेले मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले.