सुवर्ण महोत्सव (Golden jubilee - गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.

सुवर्ण महोत्सवी वर्ष हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

हे देखील पहा संपादन