समाजसुधारक ही समाजाची सुधारणा करणारी व्यक्ती असते. ह्या व्यक्ती स्वतः पलीकडे जाऊन विविध अंगाने समाजाच्या विकासासाठी काम करतात. लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारणे समाजसुधारकाचा उद्देश असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव गोविंदराव फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर , वसंंतराव नाईक , संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, फातिमा शेख इत्यादी उल्लेखनीय समाजसुधारक भारतात होऊन गेलेले आहेत.