जत्राट  गाव

गावाचे नाव जत्राट आहे. ते अगदी वेदगंगा नदी काठी वसले आहे. तसेच गावांमध्ये विहिरी आहेत त्यामुळे गावामध्ये निसर्गरम्य वातावरण आहे. नदी विहिरी असल्यामुळे शेती हिरवेगार असते . जत्राट हे गाव खेडे आहे. त्यामुळे येथे झाडे झुडूपे आहेत . तसेच गावांमध्ये समृद्धीने सर्वजण राहतात. नदी विहिरी असल्यामुळे पाण्याची टंचाई नाही. या गावामध्ये विविधाता आहे. जत्राट समृद्धीतेने नांदत आहे. गावामध्ये सर्व जातीचे लोक राहतात. तसेच गावांमध्ये महादेवाचे मंदिर गणपतीचे मंदिर पांडुरंगाचे मंदिर मारुतीचे मंदिर लक्ष्मीचे मंदिर तसेच मलिक साहेब पीर व जंगली साहेब पिर आहेत. जंगली साहेब हे प्रसिद्ध आहे. त्याचे खूप महत्त्व आहे. गावातील लोक खूप मानतात. जंगली साहेब आणि मलिक साहेब दोघे भाऊ आहेत. जंगली साहेब पीराला लोक दर बुधवारी जातात. गावा बाहेर जंगली साहेब पीर वसलेला आहे. मुसलमानांचे पीर असले तरी त्याला सर्व गावातील लोक श्रद्धा करतात. त्या पिराची मे महिन्यामध्ये यात्रा असते. या गावामध्ये दर सोमवारी बाजार असतो. गावातील सर्व लोक शेती करतात. गावामध्ये शेतीला प्राधान्य आहे. शेतामध्ये ऊस तंबाखू भाजीपाला कडधान्ये इत्यादी सारे पिके घेतात. तसेच शाहू गहू भुईमूग सोयाबीन इत्यादी सारे पिके घेतात. गावामध्ये प्रत्येक सण उत्सव साजरा करतात. प्रत्येक क्षण सर्व लोक एकत्र येऊन साजरा करतात. काही कर्नाटक बेंदूर मोठ्याने साजरा करतात. अल्हावा असतो. तसेच पांडुरंगाची दिंडी पंढरपूरला पायी दिंडी जाते. गावातील बाबा महाराजांनी समाधी घेतली आहे. ही समाधी कोठे आहे. तसेच बाबा महाराजांनी खूप तप केले. त्यांनी महागुनाच्या डोंगरावर तप केले. महा खुनाला पायी दिंडी पण जाते. महागुनच्या डोंगरावर बाबा महाराज यांचे अस्तित्व आहे. असे लोक म्हणतात. जत्राट गावामध्ये माळकरी लोक आहेत. बाबा महाराजांचा वीणा खाली ठेवत नाहीत सायन तो गळ्यात अडकवून वाजवत राहतात गावांमध्ये विविधता आहे पण सर्वजण एकत्रित राहतात. त्यामध्ये स्वच्छता खूप असते. गाव मध्ये अंगणवाडी मराठी शाळा कन्नड शाळा उर्दु शाळा आहेत. पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. डेअरी आहे आहेत तसेच सरकारी पंचायत चावडी आहेत. सरकारी सोसायटी आहे सरकारतर्फे गरीब लोकांना तांदूळ गहू डाळी तेल साबण इत्यादी दिले जाते. तसेच अर्बन बँक लोककल्याण बँक शिव महात्मा बसवेश्वर बोरगावं बँक इत्यादी आहेत. गावामध्ये सर्व जातीचे लोक राहतात. सर्वजण एकत्र राहतात. तसेच गावांमध्ये सरकारी दवाखाना आहेत. तसेच सरकारी जनावरांचा दवाखाना आहे. या गावांमध्ये मुलांसाठी जिम आहे. गावात मुला-मुलींच्या भेद मानत नाहीत. सर्व समानता आहे.या गावाला सरकारकडून गाडगेबाबा महाराज स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. गावामध्ये रस्ते केले आहेत. लाईटची सुविधा आहे. तसेच महिलांसाठी विविध संघटना निर्माण केले आहेत.