सदस्य:रंगनाथ राजेंद्र काळे/20ऑगस्ट कार्यशाळा

काळ या वृत्तपत्राची सुरवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली.हे पत्र सुरु झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरु करण्याचे धाडस यांनी दाखविले. शिवरामपंतांचे काळ हे वृत्तपत्र सुरु झाले. प्रसिद्धीचा वार शुक्रवार होता.लोकांत दृढममुल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदासाठी काळाचा जन्म आहे.असे हे पत्र काढण्यामागचे उदिष्ट शिवरामपंतांनी जाहीर केले होते. लोकांच्या मनात पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी व त्यांनी स्वतंत्राचा ध्यास घ्यावा, असा आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे व्यापक व्यासपीठ निर्माण करावे या विचाराने काळ ची निर्मिती झाली.

   असा विशिष्ट मताचा प्रचार हेच मुख्य उदिष्ट असल्याने काळ मध्ये बातम्यान फरचे स्थान नव्हते. काही जाहिराती,थोड्या बातम्या वगळल्या,तर सर्व मजकूर शिवरामपंतांचाच असे.त्यांच्या लेखनात भावनेला अधिक प्राधान्य होते आणि लेखनही शैलीदार होते.
    काळ मधील कडक लेखनाची छापखानेवाल्यांना भीती वाटली.सरकारच्या रोषाला बळी पडू असे वाटल्याने त्यांनी पत्र छापण्यास नकार दिला.यांची कल्पना असल्याने शिवरामपंतांनी आपला स्वतंत्र छापखाना पुढे त्यांना आपल्या स्वराज लोकप्रियता वाढत गेल्याने काळ ने लवकरच त्यांना चांगली परिस्थिती प्राप्त करून दिली.अर्थात हा व्यवसाय त्यांनी पैशासाठी अजिबातच सुरु केला नव्हता.
     काळ या शब्दाची व्यापक कल्पना स्पष्ट करणारा अग्रलेख शिवरामपंतांनी पहिल्याच अंकात लिहला. यात प्रतिभा कल्पकता आणि देशभक्तीची चुणूक दिसते.काळ हा सर्वसाक्षी आहे तसा सर्वविनाशीही आहे,आपल्या अग्रलेखात काल्त्त्वाचे मोठे विलोभनीय व व्यापक रूप त्यांनी उभे केले होते. आपल्या पत्राचा उदेश बाळबोधपणे सांगण्यापेक्षा काव्यमय कल्पकतेने त्यांनी सांगितला.त्यावरून कालचे स्वरूप असे असेल हेही स्पष्ट होते.
         शिवरामपंतांना काळ हे नाव टाइम्स या इंग्रजी पत्रावरून सुचले असावे. कारण केसरीत जाहिरात करताना काळच्या नावाखाली त्यांनी इंग्रजीत टाइम्स हा शब्द लिहला होता काळ या शोब्दातून ध्वनित होणारे काळ घडवणारे,काळावर प्रभुत्व गाजविणे, इंग्रजानचा काळ असे अनेक प्रकारचे कार्य या पत्राने केले. या पत्रातील शिवरामपंतांच्या लेखनात निबंधात स्वत्रांची आकांक्षा आणि प्रखर राष्टीय बाणा याचा उत्कट आणि प्रभावी अविष्कार झालेला दिसतो व्क्रोत्ती -व्याजोक्तीची धार असलेली लेखणी यांनी अस्त्राप्रमाने पवापरून प्रतिपक्षाला नामोहरण केले.पांडित्य व प्रतिभा यांचा मिलाफ असलेल्या त्यांच्या काळ मधील लेखांचे वाड्मयीन मोळी मोठे आहे.
          काळ ने टिळकांच्या राजकाणाचा व केसरी च्या धोरणांचा पुरस्कार केला.सुरवातीला काळ मध्ये त्यांनी वैदिक धर्माचे महत्व, जातीभेद, सुधारक इ.विषयांवर आवडीने लिहले