श्रीकांत लागू (इ.स. १९३५ - ७ मे, २०१३:वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे विविध विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आणि लागू बंधू मोतीवाले पेढीचे संचालक होते. लागू यांना नाटक, खेळ, गिरिभ्रमण, छायाचित्रण अशा अनेक विषयांत रुची होती.

पुण्यात जन्मलेल्या लागू यांनी मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळात श्रीलंकेत झालेल्या जलतरण स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. रंगायन, आविष्कार, रूपवेध आदी नाटय़ संस्थांशी ते निगडित होते. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘आम्ही जिंकलो आम्ही हरलो’,’श्रीरंग प्रेमरंग’ आदी नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. कैलास मानसरोवर ते अंटार्क्टिका हा प्रवासही त्यांनी केला होता. दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

पुस्तके संपादन

  • अ‍ॅनिमल फार्म (अनुवादित)
  • अमावास्येचा पूर्ण चंद्र (ग्रहणावरील पुस्तक)
  • कथा एका राष्ट्रजन्माची (अनुवादित)
  • केवळ मानवतेसाठी
  • कोंदणसांगाती सह्य़ाद्रीचा, शिखरावरून
  • झेपावलेले मुक्तिपंख (अनुवादित)
  • ढाक्क्याची शरणागती
  • मला निसटलंच पाहिजे (अनुवादित; मूळ लेखक - स्लाव्होमिर राविझ; शब्दांकन - रोनाल्ड डाउनिंग)
  • विम्बल्डनच्या तृणांगणावर
  • शिखरावरून
  • सागरसफर तृष्णाची
  • सांगाती सह्य़ाद्रीचा