श्रीकांत देशमुख
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांचा जन्म ३ जुलै, १९६३ मध्ये मौजे राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. मुळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून सद्या ते नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत.
श्रीकांत देशमुख | |
---|---|
जन्म नाव | श्रीकांत साहेबराव देशमुख |
जन्म |
जुलै ३, इ.स. १९६३ राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | सनदी अधिकारी |
साहित्य प्रकार | कविता, कादंबरी, |
विषय | सामाजिक, ग्रामीण |
प्रसिद्ध साहित्यकृती |
बळिवंत बोलावे ते आम्ही पिढीजात |
पत्नी | शालिनी |
अपत्ये | सुशांत, मुक्ता |
पुरस्कार |
|
शैक्षणिक माहितीसंपादन करा
- नुतन माध्यमिक विद्यालय, राहेरी (१०वी पर्यंत)
- शिवाजी महाविद्यालय, चिखली (१२वी पर्यंत)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.ए., राज्यशास्त्र)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.फिल.- 'महाराष्ट्राची शेतकरी चळवळ')
प्रकाशित साहित्यसंपादन करा
कविता संग्रहसंपादन करा
- बळिवंत (१९९७)
- आषाढमाती (२००३)
- बोलावे ते आम्ही (२०१३)
कादंबरीसंपादन करा
- पिढीजात
नाटकसंपादन करा
- नली (नाट्यरूपांतर, शंभु पाटील)
ललितगद्यसंपादन करा
- पडझड वाऱ्याच्या भिंती (२०१५)
- साखर कारखानदारीतले दादा (२०१६)
वैचारिकसंपादन करा
- महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ : प्रस्तावना डॉ. भा.ल. भोळे (१९९७)
- कुळवाडी भूषण शिवराय : प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे (२०१३)
संपादनसंपादन करा
- महानोरांची कविता (समीक्षा संपादन) (२००३)
- समकालीन साहित्यचर्चा : डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ (२०१०)
- भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (२०१५)
पुरस्कारसंपादन करा
- 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार[१] [२]
- महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका (२००४)
- महाराष्ट्र राज्य शासन, केशवसुत पुरस्कार (२०१४)
- लोकमंगल पुरस्कार, सोलापूर (२०१३)
- मराठवाडा साहित्य परिषद, म.भि. चिटणीस पुरस्कार (१९९८)
- विशाखा साहित्य पुरस्कार, नाशिक (१९९८)
- पद्मश्री विखे पाटील सन्मान, प्रवरानगर (१९९८)
- बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद (१९९८)
- यशवंतराव चव्हाण सन्मान, पुणे (१९९८)
- कै .भि.ग. रोहमाने पुरस्कार, कोपरगाव (१९९८)
- दुःखी, राय हरिशचंद्र साहनी पुरस्कार, जालना (२००४)
- मराठवाडा साहित्य परिषद, कुसूमावती देशमुख पुरस्कार, औरंगाबाद (२००४)
- ना.घ. देशपांडे पुरस्कार, बुलढाणा (२००४)
- शिवार प्रतिष्ठान, शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद (२०१४)
- दाते प्रतिष्ठान, वर्धा (२०१४)
- चैत्रसंवाद, नाशिक (२०१४)
- नारायण सुर्वे पुरस्कार, अमरावती (२०१४)
- शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर (२०१४)
- प्रसाद बन पुरस्कार, नांदेड (२०१४)
- मुद्रा पुरस्कार, जालना (२०१४)
संदर्भसंपादन करा
- ^ "श्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार". 25 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "...म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं". 25 February 2021 रोजी पाहिले.