वानखेडे स्टेडियम

मुंबईमधील क्रिकेट स्टेडियम

वानखेडे स्टेडियम हे मुंबई, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नूतनीकरणानंतर आता स्टेडियमची क्षमता ३३,१०८ आहे. क्षमतावाढ करण्यापूर्वी, क्षमता अंदाजे ४५,००० होती.[१]

वानखेडे मैदान
वानखेडे मैदान, फेब्रुवारी २०११
मैदान माहिती
स्थान मुंबई
स्थापना १९७४
आसनक्षमता ४५०००
मालक मुंबई क्रिकेट एसोसिएशन
प्रचालक मुंबई क्रिकेट एसोसिएशन
यजमान मुंबई इंडियन्स,मुंबई, भारत

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २३ जानेवारी - २९ जानेवारी १९७५:
भारत  वि. वेस्ट इंडीझ
अंतिम क.सा. १८ मार्च - २२ मार्च २००६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. १७ जानेवारी १९८७:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. १७ ऑक्टोबर २००७:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २००९
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

यापूर्वी हे स्टेडियममध्ये असंख्य महत्त्वाचे क्रिकेट सामने होत असत, विशेष म्हणजे २०११ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला आणि घरच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. सचिन तेंडुलकरने त्यांचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या सामना याच स्टेडियम मध्ये खेळला. याव्यतिरिक्त, १९९६ आणि २०११ क्रिकेट विश्वचषकात या स्टेडियम मध्ये बरेच सामने झाले.

संदर्भ संपादन

  1. ^ Janardhan, Arun (17 October 2013). "Sachin's last Test: Wankhede braces for ticket rush". livemint.com. 18 March 2018 रोजी पाहिले.