कण्व घराणे (इ.स.पू. ७३ ते इ.स.पू. २८) याची स्थापना वसुदेव याने इ.स.पू. ७३ मध्ये केली होती.

इतिहास संपादन

शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जाऊन तेथे कण्व घराण्याची सत्ता चालू झाली.

राजे संपादन

वसुदेव धरून कण्व घराण्यात एकूण चार राजे झाले. १. वासुदेव २. भुमीमित्र ३. नारायण ४. सुसामन (सुशर्मा)

कामगिरी संपादन

या चारही राजांनी मिळून फक्त पंचेचाळीस वर्षे राज्य केले.

शेवट संपादन

इ.स.पू. २८ मध्ये या घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला सातवाहन घराण्यातील एका राजाने ठार मारून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित करून कण्व घराण्याचा शेवट केला.