"वामनराव पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ३१:
}}
जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री. '''वामनराव पै''', सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. हे गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून [[जीवन विद्या मिशन]]च्या माध्यमातून व नाम संप्रदाय मंडळातर्फे प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.<br /><br />
==कारकीर्द==
सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. वसंतराव मुळे आणि श्री. भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली.<br /><br /> या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली.त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या सुमुहुर्तावर [[इ. स. १९५५]] साली साकार झाला.त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला. त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रध्देच्या अंधारात चाचपडणाऱ्या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे. <br /><br />नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन)ची नोंदणी [[इ. स. १९८०]] साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. [[इ. स. १९८०]] साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच [[इ. स. २००६]] साली जीवनविद्येच्या परिसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. वामनराव पै यांचे मंगळवारी २९ मे २०१२ रात्री आठच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
==कार्य==
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे , <br />
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , <br />
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर , <br />
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ||
या श्लोकातून ' सर्वेत्र सुखिन सन्तु ' चे मंत्रसार लोकांच्या भाषेतून लोकांपर्यंत पोहचवत त्यांनी जीवनविद्या मिशनची मांडणी केली.
==अधिक वाचन==
==पुस्तके==
Line ९७ ⟶ १०६:
* www.jeevanvidya.org/
==बाह्य दुवे==
* [http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=237652 वामनराव पै यांचं निधन]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13646468.cms जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे निधन]
[[वर्ग:अध्यात्म]]
|