"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
{{कॉपीपेस्ट | लेख / विभाग | दुवा =http://sanjaysonawani.blogspot.in/2011/10/blog-post_13.html | दिनांक = }}
महाराजा यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत:स्वतः उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:लास्वतःला इंदोरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चेस्वतःचे राज्य स्वत:च्यास्वतःच्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हूनस्वतःहून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत:स्वतः आपला मार्ग निर्माण केला, स्वत:चस्वतःच स्वत:चेस्वतःचे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.
 
अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी?
 
पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीचस्वतःचीच शक्ती एवढी वाढली होती की पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनरीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी िशद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर िशदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत:स्वतः ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.
त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोटय़ा रसभरीत कहाण्या बनवल्या गेल्या. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला.. पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकून बसला. त्याचेही खापर जदुनाथ सरकार यशवंतरावांवरच फोडतात. एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना ‘प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेत’ अशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांची बदनामी करणारेच होते यात शंका नाही.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. िशदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे िशदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे.
 
यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत:स्वतः मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.
 
यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..
यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चेस्वतःचे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.
‘िहदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
ओळ २९:
इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही ‘निमकहराम की हवेली’ असे म्हटले नसते. सन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.
शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़वैशिष्टय म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:चीस्वतःची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चेस्वतःचे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.
एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठीस्वतःसाठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चेस्वतःचे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.
माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत:स्वतः मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.
यशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.
यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
ओळ ३८:
यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.
 
यशवंतरावांना िहदी, पíशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत:स्वतः सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत:स्वतः उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत:स्वतः तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.
आता प्रश्न असा उपस्थित राहतो की बाजीराव पेशव्यांनी दौलतराव िशदेंच्या एवढे कह्य़ात जाऊन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे, हे तर उघड आहे.
इतिहासावरून तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा-
ओळ ४४:
२. दुसरे असे की यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने ‘औरस’ कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक ‘बंडखोर’ अशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व िशद्यांत सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. िशद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण ‘अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.
३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चेस्वतःचे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:चीस्वतःची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.
जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-
" The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.