"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
 
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
 
होळकर बऱ्यापैकी स्वतंत्र सरदार होते. मराठेशाही, मराठाराज्य वगैरेंशी बांधीलकी राखण्यापेक्षा आपली तळी भरणे, जहागीर राखणे यासाठी सर्वांशी गोड राहण्याचे त्यांचे धोरण होते. म्हणूनच होळकर मराठ्यांशीही गोड होते आणि नजीबशीही. होळकरांनी माळव्यात आणि शिंद्यांनी ग्वाल्हेरकडे मराठी राज्याचा विस्तार केला, परंतु एकदा राजवैभवाची चटक लागल्यावर दोघांचीही 'कोण छत्रपती आणि कोण पेशवे?' अशी बेदरकार वृत्ती झाली होती.
 
राजपुतान्यात हल्ले करुन चौथाई आणि खंडणीसाठी छोट्या संस्थांनांना नाडणे, हाही या दोन सरदारांचा नित्यनेम होता. त्यातल्या त्यात मल्हाररावांचा स्वभाव पैशाला लोभी असल्याचा प्रवाद होता आणि याची कुणकुण/अनुभव पेशव्यांनाही आला होता. मराठ्यांच्या या राजवटीला अन्य प्रांतातील लोक इतके कंटाळले होते की पानिपतच्या लढाईत ते मराठ्यांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत.
 
पानिपतच्या लढाईतून स्वतःला राखून हळूच पळ काढणे, शिंद्यांवर कायम कुरघोडी करणे, राजपुतांच्या अंतर्गत भांडणात ढवळाढवळ करणे, नजिबखान रोहिल्यासारख्या सापाला कायम पदराआड घालणे, अशा अनेक आरोपांमुळे मल्हाररावांचे जीवन निष्कलंक नाही. ते शूर होते यात संशय नाही, पण स्वार्थीही तितकेच होते.
 
==मृत्यू ==