[[चित्र:Yashwantrao Holkar.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (''फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान'' या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)]]
'''यशवंतराव होळकर''' (३ डिसेंबर, इ.स. १७७६ - २८ ऑक्टोबर, इ.स. १८११) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] सरदारराजे होते. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व [[इंदूर|इंदूरचे]]अन्य वतनदारसरदारांनी होतेआपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांनी इ.स. १७९७ ते इ.स. १८११ या कालखंडात इंदूर जहागिरीचाराज्यकारभार कारभार सांभाळला. [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध]] उद्भवलेल्या राजकीय वादातून यशवंतरावांनी पेशव्यांचे ठाणे असलेल्या [[पुणे|पुण्यावर]] चाल केली. इंदूरकर व पुणेकर मराठा सैन्यांमध्ये ऑक्टोबर, इ.स. १८०२ साली [[पुण्याची लढाई]] झडली व त्यात होळकरांच्या इंदूरकर सैन्याचा विजय झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून पळ काढून कोकणपट्टीकडे कूच केल्यावर त्याच्या जागी [[अमृतराव पेशवे|अमृतरावास]] पेशवेपदाची वस्त्रे देवविण्यात यशवंतरावांनी पुढाकार घेतला. यशवंतराव यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम लढा देऊन या शासन व्यवस्थेचा धोका प्रथम ओळखला होता. मराठी साम्राज्यांचा उत्तर भारतामधे विस्तार करून दिल्लीचे तख्त ताब्यात घेणारे यशवंतराव हा पहिला मराठा सेनापती होता. त्यांनी हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटले गेले. त्यांनी पेशवाईच्या विरोधात [[हडपसर]]ची लढाई जिंकून पेशवाईच्या सत्तेला लगाम घातला, यांनी ब्रिटिशांच्या विरोधात [[मॉन्स डीग]] च्या लढाया जिंकून ब्रिटिश लष्कराला हादरा दिला. ब्रिटिशांशी तह न करता त्यांनी ब्रिटिशांच्या लष्करी फौजेचा मुकाबला करण्यासाठी स्वतः [[भानपूर]] येथे तोफांचा कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात सव्वाशे तोफा त्यांच्या नियंत्रणाखाली बनवल्या गेल्या होत्या.