"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985346 परतवली.
ओळ २:
'''अहमदशाह दुराणी''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: حمد شاه درانی ;) ऊर्फ '''अहमदशाह अब्दाली''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने '''अहमदखान अब्दाली''', ([[इ.स. १७२२]] - [[इ.स. १७७३]]) हा [[दुराणी साम्राज्य|दुर्राणी साम्राज्याचा]] [[अफगाणिस्तान|अफगाण]] संस्थापक होता. आधुनिक काळातील [[अफगाणिस्तान]] देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो.
 
अहमदखान तरूणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व शौऱ्यामुळेशौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला. [[इराण|इराणाचा]] अफशरी सम्राट [[नादिरशाह|नादिरशाह अफशर]] याचा जून [[इ.स. १७४७]] साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली [[खोरासान|खोरासानाचा]] अमीर बनला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्यास]] व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, [[पाकिस्तान]], ईशान्य [[इराण]] व भारतीय उपखंडातील [[पंजाब]] प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.
 
== युद्धमोहिमा ==
ओळ १८:
नोव्हेंबर इ.स. १७५६ मध्ये अब्दालीने चौथी स्वारी करून पंजाबमध्ये प्रवेश केला. त्याचा मुलगा तिमूरशहा व सेनापती जहानखान यांनी लाहोर जिंकून घेतल्याने संपूर्ण पंजाब अब्दालीच्या ताब्यात आला. यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून गेला, यावेळी दिल्लीचा वजीर इमाद-उल-मुल्ककडे त्याने १ कोटी रूपयांची मागणी केली त्यास वजीराने नकार दिल्याने अब्दालीने दिल्लीत प्रचंड विध्वंस व अत्याचार केले. जवळजवळ १ महिना दिल्लीची लूट केल्यानंतर तो मथुरेकडे गेला. तेथील शेकडो देवालयांचा नाश केला, हजारो हिंदूंची कत्तल केली. या सर्व लुटीत अब्दालीला १२ कोटी रूपये मिळाले.
 
पानिपतच्या लढाईत मिळालेला विजय हा अब्दालीचा शेवटचा विजय ठरला. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चऱ्यानेआश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या लढाई नंतर मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी इ.स. १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. [[इ.स. १७७३]] साली त्याचा मृत्यु झाला.
 
== बाह्य दुवे ==