"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १५:
पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरीगडावरील नगारखान्याचे बांधकाम पूर्ण झाले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्त्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत की शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसेबसे जीव वाचवून बाहेर पडले.
 
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदार्‍याजबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
 
==मृत्यू ==
ओळ ३१:
मल्हारराव होळकर. होळकर घराण्याचे संस्थापक. आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनलेले एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगिकारणारे सेनानी. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य अनाथ धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.
मल्हाररावांचा जन्म धनगर कुटुंबातला. भटके जीवन. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच धनगरी भटकंतीत मुक्काम पडला होता होळ या गावी. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतांनाच खंडोजींचा मृत्यू झाला. भाऊबंदांचा जाच जसा वाढला तसा मायलेकांना सुलतानपूर परगण्यातील तळोदा येथील भोजराज बारगळांकडे आश्रय घ्यावा लागला. भोजराज हे मल्हाररावांचे मामा. होळमधील वास्तव्य संपले, पण होळ गावाचे नाव चिकटले..मल्हारराव 'होळकर' म्हणून वाढू लागले.
दाभाड्यांच्या सैन्यातील एक सरदार होता कंठाजी कदमबांडे. त्याच्या पेंढारी टोळीत सामान्य शिपाई म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. असामान्य पराक्रम आणि नेतृत्वक्षमता या गुणांमुळे थोरले बाजीराव त्यांच्याकडे मैत्रभावाने पाहू लागले. माळव्याला मराठी साम्राज्याला जोडून मल्हाररावांनी उत्तर भारतात खर्‍याखऱ्या अर्थाने मराठय़ांची सत्ता उत्तर भारतात पसरवायला सुरुवात केली व त्याची परिणती म्हणजे मल्हाररावांना १७२९ मध्ये माळव्याची सुभेदारी मिळाली. पुढे दिल्लीच्या तख्तावर प्रभाव टाकून अर्धा उत्तर हिंदुस्तान पायतळी तुडवूनही मल्हारबाबांना 'सुभेदार' म्हटलेलेच आवडायचे. कारण स्वकष्टाने, पराक्रमाने प्राप्त केलेली ती पहिली पदवी होती. चार पेशव्यांची कारकीर्द पाहणारे सर्वात धोरणी व मुत्सद्दी व झुंझार लढवय्ये म्हणून गाजलेल्या मल्हाररावांचे बव्हंशी जीवन रणमैदानावरच गेले. त्यांच्या गाजलेल्या लढाया म्हणजे १७३७ मध्ये निजामाचा ताल भोपाळ येथे केलेला दणदणीत पराभव, १७३९ मध्ये त्यांनी वसई पोर्तुगीजांकडून अक्षरश हिरावून घेतले. १८४८ मध्ये रोहिल्यांचा बिमोड करण्याची कामगिरीही त्यांनी बजावली. उत्तरेत त्यांनी मराठय़ांचे बस्तान बसवले व धाक वाढवला. जयाप्पा शिंदे या शूर सरदारानेही स्वतंत्रपणे पण पूरक असेच कार्य केले. त्यामुळे उत्तर भारत मराठय़ांच्या घोड्यांच्या टापांखाली तुडवला गेला. उत्तरेत त्यांचा एवढा धाक होता कि 'मल्हार आया..' अशी हुल उठली तरी गावेच्या गावे ओस पडत. अटकेपार झेंडा फडकावल्याचे श्रेय पेशवे, विशेषत: राघोबादादांना दिले जात असले तरी होळकर-शिंद्यांच्या अजिंक्य सेनांच्या जोरावरच हे आज अभिमान वाटणारे कार्य झाले हे विसरता येत नाही.
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जीवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. पातशाहीचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वार्‍यास्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता पातशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास पातशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसर्‍यातिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला तरी या दोघा प्रबळ सरदारांचे सार्मथ्य पाहूनच पातशहा हा करार करायला प्रेरीत झाला होता.
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढय़ात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती ्रमत्यु या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.
पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६0 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाउसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमा शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले.