"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
||
ओळ १०:
शामूशी लग्न झालेली नववधू राधा गावात येते. या लग्नासाठी राधेच्या सासूने सुखीलाला या सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. हे कर्ज कधी संपतच नाही. केवळ कर्जाच्या व्याजापोटी शामूच्या पिकाचा मोठा हिस्सा सुखीलाला घेऊन जातो. पंचायतीचा निर्णयही सावकाराच्याच बाजूने जातो. तेव्हा शामू शेतात जास्त राबायचे व जास्त उत्पन्न काढायचे ठरवतो. पण त्यामुळे त्याला एक अपघात होतो व त्याचे हात निकामी होतात. आपण आता आपल्याच कुटुंबावर ओझे आहोत या विचाराने तो ग्रासतो व निराशेतच घर सोडून कायमचा निघून जातो.
राधेला यावेळी २ मुले असतात तसेच ती गर्भारही असते. काहीच दिवसात तिची सासू मरते. राधा बाळंत होते व पुन्हा शेतात राबते. सुखीलाला तिचा विनयभंग करायचा प्रयत्न करतो, पण ती झगडून स्वतःची सुटका करून घेते. यानंतर पूर येतो व सर्व गावाची वाताहात होते. यात राधेचे लहानगे बाळ दगावते. गावकरी हार मानून गाव सोडून निघतात पण राधा खंबीरपणे थांबून
पुढे तिची मुले मोठी होतात व आईऐवजी ती नांगर ओढतात. काहीशी परिस्थिती स्थिर होत असते. पण सुखीलाला अजूनही त्याचा कर्जाचा हप्ता वसूल करतच असतो. लहान मुलगा बिरजू काहीसा उग्र स्वभावाचा असून सुखीलालावर खार खात असतो. सुखीलालाच्या मुलीला त्रास देणे त्याच्या नित्याच्या टवाळकीचा भाग असतो. तर मोठा रामू स्वभावाने शांत असतो. रामूचे लग्न गावातच
==कलावंत व त्यांच्या भूमिका==
|