"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १०:
शामूशी लग्न झालेली नववधू राधा गावात येते. या लग्नासाठी राधेच्या सासूने सुखीलाला या सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. हे कर्ज कधी संपतच नाही. केवळ कर्जाच्या व्याजापोटी शामूच्या पिकाचा मोठा हिस्सा सुखीलाला घेऊन जातो. पंचायतीचा निर्णयही सावकाराच्याच बाजूने जातो. तेव्हा शामू शेतात जास्त राबायचे व जास्त उत्पन्न काढायचे ठरवतो. पण त्यामुळे त्याला एक अपघात होतो व त्याचे हात निकामी होतात. आपण आता आपल्याच कुटुंबावर ओझे आहोत या विचाराने तो ग्रासतो व निराशेतच घर सोडून कायमचा निघून जातो.
 
राधेला यावेळी २ मुले असतात तसेच ती गर्भारही असते. काहीच दिवसात तिची सासू मरते. राधा बाळंत होते व पुन्हा शेतात राबते. सुखीलाला तिचा विनयभंग करायचा प्रयत्न करतो, पण ती झगडून स्वतःची सुटका करून घेते. यानंतर पूर येतो व सर्व गावाची वाताहात होते. यात राधेचे लहानगे बाळ दगावते. गावकरी हार मानून गाव सोडून निघतात पण राधा खंबीरपणे थांबून गावकर्‍यांचेहीगावकऱ्यांचेही मन वळविते. बैलाऐवजी स्वत: नांगर ओढते. हेच दृश्य सिनेमाच्या जाहिरातींत व भित्तिचित्र म्हणून वापरले गेले आहे.
 
पुढे तिची मुले मोठी होतात व आईऐवजी ती नांगर ओढतात. काहीशी परिस्थिती स्थिर होत असते. पण सुखीलाला अजूनही त्याचा कर्जाचा हप्ता वसूल करतच असतो. लहान मुलगा बिरजू काहीसा उग्र स्वभावाचा असून सुखीलालावर खार खात असतो. सुखीलालाच्या मुलीला त्रास देणे त्याच्या नित्याच्या टवाळकीचा भाग असतो. तर मोठा रामू स्वभावाने शांत असतो. रामूचे लग्न गावातच राहणार्‍याराहणाऱ्या मुलीशी होते. तर बिरजू मात्र शस्त्र बाळगतो आणि दरोडेखोर बनतो. सुखीलालाच्या घरावर दरोडा टाकून तो त्याच्या कधीही न संपणार्‍यासंपणाऱ्या कर्जाच्या चोपड्याच जाळतो. पुढे सुखीलालाला ठार मारुन तो सुखीलालाच्या मुलीला तिच्या लग्नाच्या मांडवातून पळवतो. ही बातमी राधेला कळताच ती बंदूक घेउन बिरजूला शोधत त्याला गाठते. घोड्यावरून सुखीलालाच्या मुलीला घेऊन पळणार्‍यापळणाऱ्या बिरजूला ती मुलीला सोडून देण्यास फर्मावते. पण बिरजू तिची टर उडवत तू तर माझी आई आहेस म्हणत तिच्याकडे पाठ फिरवतो. अखेर राधा आपल्याच मुलाला, बिरजूला गोळी घालून सुखीलालाच्या मुलीला सोडवते व शेवटी बिरजू रक्ताने माखलेल्या राधेच्या बांगड्या ज्या सावकाराकडे पडल्या असतात त्या राधेला सोपवत राधेच्याच मांडीवर प्राण सोडतो.
 
==कलावंत व त्यांच्या भूमिका==