[[File:म. फुले मंडई.jpg|thumb|right|250px|[[पुणे|पुण्यातील]] [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार]] व [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठांच्या]] सीमेवर वसलेल्या [[मंडई, पुणे|मंडईचे]] दॄश्य.]]
शनिवार वाड्याच्या पटांगणात एक मारुतीचे मंदिर असून ते जुन्या पुण्याच्या सीमेजवळील एक पुरातन मंदिर होते.
'''शुक्रवार पेठ''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे]] शहरातील एक [[पेठ]] आहे.
पेशव्यांनी शनिवारवाडा बांधल्यानंतर या मंदिरास महत्त्व प्राप्त झाले असावे. या मंदिराने शिवरायांचा काळ, पेशव्यांची सत्ता व ब्रिटिशांच्या स्वातंत्रपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळ अशी स्थित्यंतरे पाहिलेली आहेत.
== महत्त्वाची स्थ़ळे ==
सन 1801 मध्ये पुणे हे वैभवाने नटलेले समृद्ध असे शहर होते. तथापि, 1818 मध्ये पेशवाई बुडाली व पुण्यास अवकळा झाली. यावरून सामान्य जनांची त्या वेळी काय स्थिती झाली असावी याची कल्पना केलेली बरी!
* महात्मा फुले मंडई
* [[केळकर संग्रहालय|राजा दिनकर केळकर संग्रहालय]]
दरम्यानच्या काळात ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या समोरील पटांगणात पुण्याची भाजी मंडई भरण्यास सुरवात झाली, तर पटांगणतील मारुती मंदिराजवळ बटाटा विक्रीचे गाळे असल्याने या मंदिरास "बटाटा मारुती' म्हणण्याची प्रथा पडली.
{{विस्तार}}
सन 1923 मध्ये जेव्हा नवा पूल बांधण्यात आला, तेव्हा मूळच्या या हेमाडपंती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्वीचे एक कंत्राटदार श्री. केंजळे यांनी केला. त्यानंतर सन 2008 मध्ये पुणे महानगरपालिकेने आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना, शनिवार वाड्याच्या सुशोभिकरणाच्या वेळी या मारुती मंदिराचे पुन्हा नूतनीकरण केले. वरील सर्व स्थित्यंतरे समजल्यानंतर शनिवार वाड्याच्या समोरील पटांगणात एके काळी भाजी मंडई भरत होती, या प्रसंगात आपण अविश्वासाने काही काळ रमतो ना रमतो तोच ही भाजी मंडई तेथे किती काळ होती? त्यानंतर ती कोठे व कधी हलविली गेली, हे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. ऐतिकासिक शनिवार वाड्यासमोर त्या वेळी भरणाऱ्या भाजी मंडईमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या व त्यामुळे ती हलविण्याची गरज निर्माण झाली. मग या भाजी मंडईचे स्थलांतर करण्यासाठी एका खास, वैशिष्ट्यपूर्ण वास्तूची उभारणी करण्यात आली. ती वास्तू म्हणजे आजची "आपली' महात्मा फुले मंडई.
{{पुणे}}
[[वर्ग:पुण्यातील पेठा]]
भाजी व्यापाऱ्यांचे स्थलांतर हा विषय आजच्या इतकाच त्या काळीही बिकट होता. विविध समस्यांना तोंड देत ही मंडई नवीन वास्तूमध्ये स्थलांतर तर झाली; परंतु शनिवारवाड्याच्या पटांगणातील मारुती मंदिरास "बटाट्या मारुती' हे नाव कायम स्वरूपी बहाल करून गेली. भाजी मंडई या दैनंदिन जिव्हाळ्याच्या विषयासाठी बांधण्यात आलेल्या "महात्मा फुले मंडई' या वास्तूची वैशिष्ट्ये, तत्कालीन परिस्थिती व त्यानंतरच्या घडामोडी यांची माहिती घेणे ही आज तितकेच मनोरंजक व महत्त्वपूर्ण आहे.
सन 1982 पर्यंत पुण्याची मंडई शनिवार वाड्यासमोरील पटांगणामध्ये भरत होती. उघड्यावरील खाद्यपदार्थ-भाजीपाला आरोग्यास हानिकारक असल्याने तसेच विक्रेते व खरेदीदारांच्या गर्दीचा विचार करून नगरपालिकेने नवीन भाजी मंडई म्हणून या वास्तूची सन 1885 मध्ये उभारणी केली. त्या वेळी या वास्तूच्या बांधकामास रु. 2 लाख 30 हजार इतका खर्च आलेला असून, तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर "लॉर्ड रे' यांचे नाव या इमारतीस देण्यात आले होते.
सदरच्या भाजी मंडईच्या बांधकामास अनेक कारणास्तव व्यापारी व नागरिकांनी विरोध केलेला होता व वास्तू बांधून झाल्यानंतरही या वास्तूमध्ये व्यापारी जाण्यास तयार नव्हते. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना कडक पवित्रा घ्यावा लागला व त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, निर्णय नगरपालिकेच्या बाजूने लागल्याने व्यापाऱ्यांना सक्तीने या नवीन मंडईत हलविण्यात आले. या इमारतीमध्ये पूर्वी "लॉर्ड रे' संग्रहालय होते. ते नंतर घोले रोड येथील संग्रहालयाच्या इमारतीमध्ये हलविण्यात आले. पहिल्या मजल्यावर नगरपालिकेचे कार्यालयही कार्यरत होते. या वास्तूचा आराखडा हा विक्रेते व ग्राहक यांच्या सुविधांचा विचार करून प्रसिद्ध वास्तूरचनाकार रा. ब. वासुदेव बापूजी कानिटकर यांनी तयार केला. बांधकामासाठी स्थानिक करड्या रंगाचा दगड वापरलेला असून, मध्यभागी 120 फूट उंचीचे अष्टकोनाकृती शिखर असलेली ही दुमजली इमारत नियोगॉथिक शैलीचा एक उत्तम नमुना आहे.
इमारतीच्या तळमजल्यास दुकाने व मुख्य इमारतीस आठ स्वतंत्र भाग जोडण्यात आलेले आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे गाळे आहेत. भव्य कमानी. खिडक्यांची रचना, अष्टकोनी वैशिष्ट्यपूर्ण शिखर इ. मुळे या वास्तूस एक वेगळाच दिमाख व भव्यता प्राप्त झालेली आहे. दर्शनी भागातील कमानीसमोर छोट्याशा बागेत पं. मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते मूर्तिकार वाघ यांनी केलेला लो. टिळकांचा पूर्णाकृती पुतळा सन 1924 मध्ये बसविण्यात आला. त्यानंतर सन 1939 मध्ये या मंडईचे नामकरण "महात्मा फुले मंडई' असे करण्यात आले आहे.
आगळ्या वेगळ्या वास्तुशैलीच्या या इमारतीला पुणेकरांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असून, आपल्या खास वैशिट्यामुळेच या वास्तूला एक वेगळीच शान प्राप्त झाली आहे.
|