"ईशावास्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५०:
अर्थ - आत्मज्ञानी, धैर्यशील लोकांनी आम्हाला जे नीट शिकविले आहे ते आम्ही ऐकले आहे; ते म्हणजे विद्या व अविद्या ह्यांचा अर्थ अगदीच वेगळा आहे. ॥१०॥
<br /><br />
'''विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ ११॥'''
 
अर्थ - कर्म व अकर्म ह्यांचे रहस्य मोठमोठे विद्वान पुरुषही जाणत नाहीत. त्यामुळे ज्ञानाचा अभिमानी मनुष्य कर्म हे ब्रह्मप्राप्तीला बाधक समजतो आणि उचित, विहित, अटळ कर्माचाही चुकीने त्याग करतो. पण त्या त्यागामुळे त्याची कर्म बंधनातून सुटका होतच नाही कारण कर्म न करणे हेच त्याचे कर्म होते. मोहाने/रागाने त्याग केला तर तो राजस/तामस त्याग; त्याग ठरत नाही. विहित कर्म अनासक्त राहून करणे हाच त्याग होय आणि अशा कर्मानेच "मृत्युं तीर्त्वा" म्हणजे कर्मबंधनच न लागल्यामुळे जन्ममृत्युच्या साखळीतून सुटका होते. उलट ज्ञानीपणाच्या अभिमानाने स्वैर व अविहित कर्मे घडून मनुष्य प्रमादी होतो आणि पुढे मूढ योनीतही जन्माला येतो. म्हणूनच कर्म हे जरी अविद्येच्या, मायेच्या, द्वैताच्या प्रांतातले असले तरीही त्याचे अनासक्ती व ईश्वरार्पण बुद्धीच्या आश्रयाने आचरण केले तर मनुष्य मृत्युलोकातून तरतो आणि भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून तो अमृतत्वास पोहोचतो.
ओळ ६१:
 
अर्थ - परमेश्वराची सर्वात्मभावाने उपासना करणे हाच ’संभव’ (संभूति) खरा अर्थ होय. तसेच परमेश्वराची आज्ञापालन करण्याचा भाग म्हणून देव, ब्राह्मण, गुरु, माता, पिता आदींचा पूज्य भावाने आदर करणे, त्यांची पूजा, सेवा करणे हा ’असंभव’ (असंभूति) चा खरा अर्थ होय. म्हणजेच विनाशशील आराध्य दैवताच्या ठिकाणीही परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपाचीच आराधना करण्याची भावना ठेवणे, तसेच स्वतःकडे कर्तेपणाचा अभिमान न धरणे होय.
<br /><br />
'''संभूतिं च विनाशं च यस्तद् वेदोभयóè सह । विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥१४॥'''
 
अर्थ - अविनाशी परब्रह्म जो जाणतो व विनाशशील देवादिकांनाही जाणतो, तो त्या देवतांच्या उपासनेतूनही मृत्युवर मात करतो आणि परमेश्वराच्या आराधनेने तर तो पूर्ण अमृतत्त्व प्राप्त करतो. विनाशशील देवांकडून मिळणारे फळ क्षणजीवी आहे. जेवढे भोग्य पदार्थ आहेत ते सगळे परिणामी दुःखच देणारे असतात. पण त्या सर्वांत जी मूळ सत्ता आहे, शक्ती आहे ती परमेश्वराचीच आहे आणि देवादिकांसाठी जरी आपण उपासना केली तरी ती परमेश्वराचीच उपासना असते; अशा स्पष्ट धारणेने साधक जरी अन्य देवतांची उपासना करील तरीही तो मृत्युंजय होईल आणि संभूती म्हणजे परमेश्वराचेच व्यापक रूप जो मनी आणून त्याची आराधना करील तो ही जन्म-मरणापलीकडे शाश्वत अमृतरूप असा होईल. ॥१४॥
<br /><br />
'''हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥'''
 
अर्थ - सत्यावर मायेचे आवरण पडलेले आहे, ते आवरण दूर कर अशी पूषन् नामक सूर्यदेवतेची प्रार्थना ह्या श्लोकात आहे. परमेश्वराचे दर्शन घडण्याच्या बाबतीत "सोन्याचे पात्र" आड येते. परमेश्वराने कृपा करून मूळच्या आपल्या अव्यक्त रूपावर आलेले मायेचे आवरण दूर करावे. त्यानेच आमच्या दृष्टीला सत्य काय ते कळेल. साधक स्वप्रयत्नाने नित्यानित्यविवेक करील. पण सत्यस्वरूपाचा साक्षात्कार परमेश्वरी कृपेनेच होतो. सांसारीक जीवनात सुखोपभोग हे माणसाला मोठे विलोभनीय वाटतात म्हणून सोन्याचे पात्र अशा रूपकाचा उपयोग केला गेला आहे. ॥१५॥
{{विस्तार}}
{{वेद}}