"ईशावास्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
अर्थ - ते ब्रह्म (किंवा ईश्वर) चेतन आहे तसेच स्थिरही आहे. एकाच वेळी त्याच्या ठिकाणी परस्परविरोधी भाव, सामर्थ्य, गुण आणि क्रिया असू शकतात. तोच त्याच्या अचिंत्य शक्तीचा महिमा आहे. अवतार कार्य ही जी त्याची लीला आहे ते त्याचे चल रूप आहे. आणि निर्गुणनिराकारपणे राहणे; अविनाशी, अविकारी असणे हे त्याचे स्थिरत्व आहे. ज्याला श्रद्धा व प्रेम नाही त्याला त्याचे दर्शन होत नाही; म्हणूनच तो सर्वात दूर आहे. पण प्रेमाने, आर्ततेने हाक मारताच तो क्षणार्धात भक्ताजवळ येऊन उभा राहतो, म्हणून तो सर्वात जवळ आहे. तसेच जेथे अग्नी, चंद्र वा सूर्य ह्यांचा प्रकाश पोहचत नाही तेथे त्याचे परमधाम आहे; अर्थात तो फार दूर आहे. पण जीवरूपाने सर्वांच्या अंतःरंगात आहे म्हणून सर्वात जवळ आहे. ॥५॥
<br/><br/>
'''यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥'''
अर्थ - ईश्वराची आराधना / भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनाची शांत स्थिती कशी असते आणि कोणत्या प्रचीतीमुळे ती तशी होते ते ह्या मंत्रात सांगितले आहे. जो स्वतःमध्ये सर्व जगाला पाहातो आणि जगातील सर्व वस्तुमात्राच्या ठिकाणी स्वतःला पाहातो; त्याला दुसऱ्या कोणाचाही व कशाचाही तिरस्कार अथवा घृणा वाटत नाही. (कारण तशी घृणा केली तर आपणच आपली घृणा केली असे होईल.) तो सर्वत्र एकच ईशतत्त्व पाहातो. ॥६॥
{{विस्तार}}
|