"ईशावास्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १७:
 
अर्थ - ह्या जगात शास्त्रविहित कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा केली पाहिजे. ह्या प्रकारे कर्म केल्यास तुला (मनुष्याला) कर्म बंधनकारक होत नाही. ह्याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग नाही. ॥२॥
<br/><br/>
'''असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताóèस्ते प्रेत्याभिगच्छति ये के चात्महनो जनाः ॥३॥'''
 
अर्थ - जे अंधाराने, तमाने भरलेले लोक (स्थाने) आहेत त्यांचे नाव ’असुर्या’ लोक असे आहे. जे आत्मघात (आत्मा म्हणजेच देहादी उपाधी असे मानणे हाच आत्मघात) करतात ते मरणानंतर ह्याच ’असुर्या’ लोकाप्रत जातात. ॥३॥
<br/><br/>
'''अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन् पूर्वमर्षत् | तद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत् । तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥'''
 
अर्थ - ईश्वर सर्वांच्या आधीचा आहे. त्याचे ज्ञान इतर कोणाही देवांना नाही पण तो मात्र सर्व देवांना जाणतो. तो स्वतः स्थिर असून सर्वांना चालना देतो. सर्वांपेक्षा (मनापेक्षाही) तो वेगवान आहे. त्याच्याच सत्तेच्या आधीन होऊन सर्व पंचमहाभूते काम करतात. उदा. वारा वाहतो तो ईश्वराच्या सत्तेने, स्वतःच्या सत्तेने नव्हे.
<br/><br/>
'''तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः ॥५॥ '''
 
अर्थ - ते ब्रह्म (किंवा ईश्वर) चेतन आहे तसेच स्थिरही आहे. एकाच वेळी त्याच्या ठिकाणी परस्परविरोधी भाव, सामर्थ्य, गुण आणि क्रिया असू शकतात. तोच त्याच्या अचिंत्य शक्तीचा महिमा आहे. अवतार कार्य ही जी त्याची लीला आहे ते त्याचे चल रूप आहे. आणि निर्गुणनिराकारपणे राहणे; अविनाशी, अविकारी असणे हे त्याचे स्थिरत्व आहे. ज्याला श्रद्धा व प्रेम नाही त्याला त्याचे दर्शन होत नाही; म्हणूनच तो सर्वात दूर आहे. पण प्रेमाने, आर्ततेने हाक मारताच तो क्षणार्धात भक्ताजवळ येऊन उभा राहतो, म्हणून तो सर्वात जवळ आहे. तसेच जेथे अग्नी, चंद्र वा सूर्य ह्यांचा प्रकाश पोहचत नाही तेथे त्याचे परमधाम आहे; अर्थात तो फार दूर आहे. पण जीवरूपाने सर्वांच्या अंतःरंगात आहे म्हणून सर्वात जवळ आहे. ॥५॥
<br/><br/>
 
{{विस्तार}}