"दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(मराठी नकाशा)
छोNo edit summary
'''दुसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध''' (मराठी नामभेद: '''दुसरे ब्रिटिश=म्हैसूर युद्ध''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Second Anglo-Mysore War'', ''सेकंड अँग्लो-मायसोर वॉर'') हे [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूरच्या राज्याचा]] शासक [[हैदरअली]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यामध्ये [[इ.स. १७७९]] ते [[इ.स. १७८४]] या कालखंडात झडलेले युद्ध होते.
==कारणे==
[[इ.स. १७७२]] मध्ये [[मराठा साम्राज्य|मराठ्यांनी]] हैदरअलीवर आक्रमण केले असता [[मद्रासचा तह|मद्रासच्या तहात]] ठरल्याप्रमाणे ब्रिटिश हैदरअलीच्या मदतीला न आल्याने हैदरअली संतापला. [[इ.स. १७७८]] मध्ये [[अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धक्रांती|अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात]] [[फ्रांस]] अमेरिकन वसाहतीच्या बाजूने युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरूद्ध सामील झाला त्यामुळे ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या भारतातील सर्व वसाहती ताब्यात घेतल्या. या वसाहतींपैकी माहे बंदर ही फ्रेंचाची वसाहत [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूर राज्याच्या]] अधिपत्याखाली होती. माहे हे बंदर म्हैसूर राज्याच्या दृष्टीने हैदरअलीसाठी महत्वाचे होते कारण समुद्री व्यापारासाठी व बाहेरून येणार्या मालासाठी माहे बंदर हे मोक्याचे ठिकाण होते त्यामुळे माहेमध्ये हस्तक्षेप करू नये अशी सूचना हैदरअलीने ब्रिटिशांना केली परंतु ब्रिटिशांनी हैदरअलीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मार्च, [[इ.स. १७७९]] मध्ये माहे बंदराचा ताबा घेतला त्यामुळे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय हैदरअलीसमोर उरला नाही.
==युद्धादरम्यानच्या घटना==
ब्रिटिशांचा सूड उगवण्यासाठी हैदरअलीने मराठ्यांची व फ्रेंचाचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. जुलै, [[इ.स. १७८०]] मध्ये ८३,००० फौजेसह हैदरअलीने [[कर्नाटक|कर्नाटकावर]] स्वारी केली त्यावेळी त्याच्याकडे युरोपियन इंजिनियर्सनी बनवलेल्या शंभर अवजड मैदानी तोफाही होत्या. मार्गात येणारी खेडी व शहरे त्याने जाळून, लुटून उद्ध्वस्त केली. कर्नल बेरीच्या नेतृत्वाखालील ४००० च्या ब्रिटिश फौजेला हैदरअलीने कोंडीत पकडले व तिला [[पोलिलोर]] येथे सप्टेंबर, इ.स. १७८१ मध्ये शरण येण्यास भाग पाडले. ऑक्टोबरमध्ये [[अर्काट]]ही हैदरअलीच्या हातात पडले. [[बक्सार]] येथे विजय मिळविणारा सर हेक्टर मन्रो हासुद्धा हैदरअलीसमोर टिकाव धरू शकला नाही. हेक्टर मन्रोने त्याच्याकडील अवजड तोफखाना कनिवेरम तलावात बुडवून टाकला व [[मद्रास]]कडे माघार घेतली.</br>
६३,६६५

संपादने