"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २८:
* [[खंडेराव होळकर]]
* [[पानिपतची तिसरी लढाई]]
{{पुनर्लेखन}}
 
मल्हारराव होळकर. होळकर घराण्याचे संस्थापक. आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनलेले एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगिकारणारे सेनानी. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य अनाथ धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.
मल्हाररावांचा जन्म धनगर कुटुंबातला. भटके जीवन. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच धनगरी भटकंतीत मुक्काम पडला होता होळ या गावी. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतांनाच खंडोजींचा मृत्यू झाला. भाऊबंदांचा जाच जसा वाढला तसा मायलेकांना सुलतानपूर परगण्यातील तळोदा येथील भोजराज बारगळांकडे आश्रय घ्यावा लागला. भोजराज हे मल्हाररावांचे मामा. होळमधील वास्तव्य संपले, पण होळ गावाचे नाव चिकटले..मल्हारराव 'होळकर' म्हणून वाढू लागले.
ओळ ३५:
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढय़ात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती ्रमत्यु या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.
पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६0 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाउसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमा शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले.
== संदर्भ ==
<references/>
 
[[वर्ग:होळकर घराणे]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
 
[[ca:Malhar Rao Holkar]]
[[en:Malhar Rao Holkar]]