मध्य [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] काही विशिष्ट [[जात|जातींमध्ये]] आढळणारा एक [[आनुवंशिक]] रोग<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52250</ref>.यात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण बिघडुन गोल स्वरुपात असणार्याअसणाऱ्या लाल रक्तपेशी ह्या विळ्याच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी सुमारे १२० दिवस जिवंत राहतात पण या रोगग्रस्ताच्या फक्त ३० ते ४० दिवस.महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे या रोगाने प्रभावित आहेत.[[विदर्भ|विदर्भातील]] एकही जिल्हा सिकलसेलमुक्त नाही. लगतच्या [[मध्यप्रदेश]] [[आंध्र प्रदेश]] [[छत्तिसगढ]] आदि राज्यातपण असलेला हा रोग भारतातील एकुण १२ राज्यात आढळला आहे.[[विदर्भ|विदर्भात]] याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52262</ref>सुमारे ४६ जाती या रोगाने ग्रस्त आहेत. हा जन्मापासुनच होणारा रोग आहे. यात रुग्णाचे आयुष्य फार तर १७-१८ वर्षाचेच असते.हा रोग प्रजोत्पादनाद्वारे पसरतो.याच्या रोगनिवारणासाठी औषधोपचाराचा अद्याप शोध लागला नाही.