"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार [[समतावादी पक्ष]], संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटना येथे दृश्यमान होतात. युद्धछावणीचे स्वरूप आलेले [[औरंगाबाद]] शहर,सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे,रात्रंदिवस सभा,परिषदा,मोर्चे,जेलभरो यांमुळे अवेळी जेवणं,जागरणं,प्रकृती अस्वास्थ्य आणि यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट डोळ्यांसमोर उभा रहातो.
 
[[कॉंग्रेस|कॉंग्रेसविषयी]] आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचिकता कांबळेसरांमध्ये होतीच.वसंतदादा,यशवंतराव,[[शरद पवार]] यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यामुळेच ज्यांना सुरूवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या [[वसंतदादा पाटील|वसंतदादांनीच]] सरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली,विश्वस्त मंडळावर आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय,चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा जाहिरजाहीर केला.पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केलं,ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकार्यांसनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, त्यांनी राजीनामा दिला,या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.
 
पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्यांकांबद्दल तळमळ असणार्याह वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.जनता दलाचे आखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला.सरांनी प्रा.[[मधू दंडवते]],प्रमिला दंडवते आदिंच्या सहकार्याने धर्मांतरीत बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.