अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत जाणार्याजाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. [[डायनोसॉर]] किंवा [[भीमसरट]], [[स्मायलोडॉन]] किंवा [[कट्यारदंती वाघ]], [[वूली मॅमथ]] किंवा [[केसाळ हत्ती]], [[डोडो]] पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण [[डोडो]] पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणार्या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो बर्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मिळ जैवसंपदेची अधिक माहिती [[दुर्मिळ जैवसंपदा]] या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती [[लुप्त जैवसंपदा]] या लेखामध्ये मिळेल.