बदलांचा आढावा नाही
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: ta:வீடுமர் |
No edit summary |
||
ओळ १:
[[Image:Bheeshma oath by RRV.jpg|right|thumb|290px|देवव्रत यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली.<br>[[राजा रविवर्मा]] यांचे चित्र.]]
'''भीष्म''' ही [[महाभारत]] या महाकाव्यातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. तो हस्तिनापुराचा राजा [[शंतनू]] व [[गंगा]] यांचा पुत्र होता. राजा शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच वंशजांना हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून भीष्माने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. पुढे सत्यवतीचा मुलगा [[विचित्रवीर्य]] ह्याच्या विवाहासाठी त्याने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबा हिचे सौभपती शाल्व ह्याचावर प्रेम असल्याचे कळल्यावर त्याने अंबेस शाल्वाकडे धाडले. परंतु, शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या करून [[शिखंडी]] म्हणून पुनर्जन्म घेतल्याची कथा महाभारतात वर्णिली आहे.
महाभारतीय युद्धात भीष्मांनी सेनापती म्ह्णून कुरूसैन्याचे नेतृत्व केले. भीष्म हे शिखंडीवर शस्त्र उचलत नसत, म्हणून त्याला पुढे घालून [[अर्जुन|अर्जुनाने]] भीष्मांचा युद्धात पाडाव केला. तेव्हा [[दक्षिणायन]] लागेपर्यंत प्राण रोधून त्यांनी युद्धभूमीवर प्राणत्याग केला.
{{महाभारत}}
|