"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''चळवळीचे दिवस''' हे प्रा. [[अरुण कांबळे]] यांचे आत्मचरित्र आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्त्ववाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, [[मंडल आयोग]], बौद्धांच्या सवलती, [[दलित]] राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यातील कांबळे यांची आपल्या तत्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते.
 
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे त्यांचे वडील ‘आबा’ हे [[शंकरराव खरात]], [[माधव मोडक|बंधु माधव]] यांचे शिक्षक होते. उत्तम गायक असणारे, निरिश्वरवादी, आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष [[प्रबुद्ध भारत|प्रबुद्ध भारताचा]] अंक लहानग्या अरूणकडून वाचून घ्यायचे. लेखन-वाचनाचा पहिला संस्कार सरांवर झाला. सकाळी शाळा, संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणार्या, रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणार्या आबांनी वाचनालय, बोर्डिंग़ सुरू केले. लोकसेवा वृत्तीची अशी नकळतच घडण होत होती. कविता,वक्तृत्वांत बक्षिसं मिळविणार्या व पुढे उत्तम व्याख्यानं देणार्या आपल्या मुलाचे [[जवाहरलाल नेहरू]], [[यशवंतराव चव्हाण]] यांची [[सांगली]]च्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती. ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता. आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सरांवर होता. सरांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनतांदलातील दिवस’ मधून वयाच्या तेवीसाव्या वर्षी [[दलित पँथर]]चे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तांत येतो. त्यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणार्या मराठवाड्यातील आमदारांसमोर कांबळेसरांनी ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले.
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार [[समतावादी पक्ष]], संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटना येथे दृश्यमान होतात. युद्धछावणीचे स्वरूप आलेले [[औरंगाबाद]] शहर,सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे,रात्रंदिवस सभा,परिषदा,मोर्चे,जेलभरो यांमुळे अवेळी जेवणं,जागरणं,प्रकृती अस्वास्थ्य आणि यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट डोळ्यांसमोर उभा रहातो.