"ऐतरेय ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
चार वेद--जगातले सर्वात जुने वाङ्‌मय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रत्य्क प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा. काहींचे उपवेद. ऋग्वेदाच्या २१ शाखांपैकी १९ लुप्त. फक्त दोनच शिल्लक. शाकल व बाष्कल. ऋगेद संहितेत एकूण १०,५५२ मंत्र. बाष्कल शाखेत निराळे १५ अधिक. वेदाचा संहिता हा मुख्य भाग. त्याशिवाय ब्राह्मणे आणि आरण्यके हे आणखी दोन भाग. आरण्यकाचा शेवटचा उपभाग म्हणजे उपनिषद. आरण्यकांचे पठण अरण्यात बसून करायचे पण उपनिषदाचे गुरूच्या शेजारी. ब्राह्मणग्रंथ म्हणजे गद्य साहित्य. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ते सांगितलेले असते. यज्ञातील प्रधान आणि अंगभूत कर्मे-त्यांची विविध नावे, कर्माची साधने, यज्ञाचे अधिकारी व यज्ञाची विविध फले यात सांगितली असतात. देव, असुर ऋषी इत्यादिकांच्या कथा यात असल्या तरी या वाङ्‌मयातील बराचसा भाग रूक्ष आणि कंटाळवाणा. तरीसुद्धा वेदांपासून संस्कृतभाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहास ब्राह्मणग्रंथांवरून समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहण म्हणून याला फार महत्व आहे.
 
ऋग्वेदाची '''ऐतरेय ब्राह्मण''' व कौषीतकी ऊर्फ शांखायन ब्राह्मण, त्यांची आरण्यके आणि त्यांना जोडलेली '''ऐतरेय''' व कौषीतकी ही उपनिषदे सर्वच उपलब्ध आहेत.
 
वर्ण या शब्दाचा वैदिककाळी अक्षर असाच अर्थ होता. याचा पुरावा '''ऐतरेय ब्राह्मणात''' आहे. तेथे म्हटले आहे की 'त्याने तीन धातू तापवले आणि त्या अतितप्त धातूंपासून अकार, उकार आणि मकार जन्मले. त्यांना एकरूप केले तो हा ॐ. वेदवाङ्‌मयाच्या पाठांतरास अत्यंत पावित्र्य आल्यानंतर लेखनकलेचे महत्व पुरोहित विसरले, म्हणून फार प्राचीन बुद्धपूर्व काळातील लेखनाचा पुरावा आज सापडत नाही.
 
ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा खोल परिणाम''' ऐतरेय ब्राह्मण''' (४०।५), शतपथ ब्राह्मण (१०।३।५; ११।२।३) व तैत्तरीय ब्राह्मण (२।८।८।९ व २।८।९।७) यांच्यावर झालेला दिसतो.
 
वैदिककाळी भूमीची वाटणी होत नसे. राजाला सुद्धा भूदानाचा अधिकार नव्हता. विश्वकर्मा भौवन या राजाने सर्वमेध केला तेव्हा तो कश्यप ऋषीस भूमिदान करू लागला. तेव्हा भूमी त्यास सांगते, " मला कोणताही मर्त्य देऊ शकत नाही. तू मूर्ख आहेस. तुझी मला कश्यपास दान देण्याची प्रतिज्ञा मिथ्या आहे. तू माझे दान केल्यास मी पाण्यात बुडून जाईन."--('''ऐतरेय ब्राह्मण''' (३९।७), शतपथ ब्राह्मण (१३।७।१।१५).