"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
}}
 
'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[मार्च ३]], [[इ. स. २०००]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित ''[[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]]'' या चित्रपटातून [[इ.स. १९७५]] साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या ''झुंज'' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]] सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]] साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. ''सुशीला'', ''गोंधळात गोंधळ'', ''मुंबईचा फौजदार'', ''जखमी वाघीण'', ''भुजंग'', ''एक डाव भुताचा'', ''चानी'' हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.
 
[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ. स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>.