"किशनजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु २४ नोव्हेंबर २०११) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरवातीच्या काळापासुन कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पश्चिम बंगाल राज्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.
==सुरवातीचे आयुष्य व शिक्षण==
कोटेश्वरचा जन्म पेद्दापल्ली गावात ( जिल्हा करीमनगर, राज्य [[
==नक्षलवादी चळवळीत प्रवेश==
[[हैदराबाद]] येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख कोंडापल्ली सीतारामय्या सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व कोटेश्वरराव दोघेही भूमिगत झाले.
==नक्षलवादी चळवळीतील आयुष्य==
आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य [[
==मृत्यु==
२२ नोव्हेंबर २०११ पासुन २०७ कोब्रा बटालियन (207 Combat Battalion for Resolute Action (CoBRA) Battalion) चे जवान व १६७ व १८४ केंद्रीय राखीव पोलिस दल ( सी आर पी एफ Central Reserve Police Force ) बटालियनचे जवान व पश्चिम बंगाल पोलिसांचे Counter Insurgency Force (CIF),यांनी कुसबानी च्या जंगलात मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम हाती घेतली.
|