"पी. चिदंबरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो bad link repair, replaced: १९४५इ.स. १९४५ (26) using AWB
छोNo edit summary
ओळ ९:
चिदंबरम [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[तामिळनाडू]] राज्यातील [[शिवगंगा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या निवडणुकीत [[तामिळ मनिला कॉंग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
 
ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात उपमंत्री आणि राज्यमंत्री होते. [[इ.स. १९९१]] मध्ये [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मंत्रीमंडळात ते [[वाणिज्यमंत्री]] झाले. त्यांनी वाणिज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्वाचेमहत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदंबरम यांचाही वाटा महत्वाचामहत्त्वाचा आहे.<ref>[१]</ref>
 
चिदंबरम [[इ.स. १९९६]] ते [[इ.स. १९९८]] दरम्यान देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये [[अर्थमंत्री]] होते. त्यांनी [[इ.स. १९९७]]-[[इ.स. १९९८]] साठीचा मांडलेला अर्थसंकल्प ’आदर्श अर्थसंकल्प’ म्हणून मानला जातो.<ref>[२]</ref> [[इ.स. १९९८]] ते [[इ.स. २००४]] अशी सहा वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर चिदंबरम [[मनमोहन सिंह]] यांच्या मंत्रीमंडळात [[मे]] [[इ.स. २००४]] मध्ये परत अर्थमंत्री झाले. ते त्या पदावर [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. २००८]] पर्यंत होते. [[नोव्हेंबर २६]], [[इ.स. २००८]] रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर गृहमंत्री [[शिवराज पाटील]] यांनी राजीनामा दिला आणि भारताचे नवे गृहमंत्री म्हणून त्यांच्या जागी चिदंबरम यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून चिदंबरम गृहमंत्री पदावरच आहेत.