भाकरा नांगल धरण'''{{लेखनाव}}''' हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो [[पंजाब]] आणि [[हिमाचल प्रदेश]] यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. [[सतलज नदी|सतलज नदीवर]] असलेले भाकरा धरण [[पंजाब]] आणि [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशला]] पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरुन [[दिल्ली]], [[चंदिगड]]सह उत्तर भारतातील बर्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] भाकरा नांगल धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात येते. या भागाच्या पाहणीत हे लक्षात आल्यावर धरण बांधताना हार्वे स्लोकम या स्थापत्यशास्त्रज्ञाने त्या भागातील फुटके-तुटके खडक व माती बाजूला करून तेथे लाखो टन काँक्रीटची भर घातली व मगच धरण बांधले.