"शोले (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३८:
 
== कथानक ==
चित्रपटाच्या सुरुवातीला एक पोलीस अधिकारी ठाकूरठाकुर बलदेवसिंगाने बोलावल्यामुळे त्यांना भेटायला येतात. भेटीमध्ये ठाकूरठाकुर पोलीस अधिकार्‍याला आपला बेत सांगतो. काही वर्षांपूर्वी पोलीससेवेत असताना त्याने जय आणि वीरू नावाच्या दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते. त्यांना तुरुंगात नेताना वाटेत पोलिसांवर डाकूंचा हल्ला होतो. जय व वीरू पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी आपले पाश सोडवण्याची विनंती करतात. ठाकूरठाकुर आपल्या जोखमीवर दोघांना मोकळे करतो. जय, वीरू व ठाकूरठाकुर असे तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतवून लावतात. परंतु या चकमकीत ठाकूरठाकुर घायाळ होतो. खरे तर, जय व वीरूंसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते. परंतु ठाकुराला हॉस्पिटलात पोचवायचे की नाही यासाठी जय नाणेफेक करतो. नाणेफेकीचा निर्णय होकारात्मक ठरतो. त्याप्रमाणे ते दोघे ठाकुराला हॉस्पिटलात पोचवतात व त्याचा जीव वाचवतात. ठाकुराला ही गोष्ट आठवते. जय आणि वीरू हे दोघे गब्बरसिंग नावाच्या अतिशय क्रूर डाकूविरुद्ध झुंजण्यास लायक आहेत असे ठाकुराला वाटत राहते. म्हणून, या दोघांना हुडकून देण्याची विनंती ठाकूरठाकुर भेटीला आलेल्या पोलिस अधिकार्‍याला करतो.
 
इकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोर्‍या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गाढ होते. पोलिस अधिकार्‍यांना हे दोघेजण एका तुरुंगात आढळतात. त्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकूरठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.
 
===गब्बरसिंगाची दहशत===
गब्बरसिंग हा ठाकुराच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गावकर्‍यांकडून पाहिजे तशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात छाटून टाकतो. तेव्हापासून ठाकूरठाकुर आपले हात शाल पांघरून सतत झाकून ठेवीत असतो. गब्बरसिंग कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत असल्याने त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकर्‍यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरसिंगाच्या टोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा यांसारखे लोक गब्बरसिंगाच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकूरठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी देणार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी दोन शूर शिलेदार आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरू दोघेही चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.
 
इकडे कालिया आपल्या इतर दोन साथीदारांसह रिकाम्या हातांनी परत आल्यामुळे गब्बरसिंगाचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दबदब्याच्या दृष्टीने घातक असते. या अपयशाची शिक्षा म्हणून गब्बरसिंग कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बरसिंग स्वत: डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवतो.
 
ठरवल्याप्रमाणे गब्बरसिंग होळीच्या दिवशी गावात सण साजरा होत असताना हल्ला करतो. गब्बरसिंगाचे साथीदार व जय-वीरू यांच्यामध्ये जोरदार चकमक झडते. गब्बरसिंग जयाला ओलीस ठेवतो व सर्वांना शस्त्रे खाली टाकायला सांगतो. जय स्वतःहून गब्बरसिंगापुढे झुकत असल्याचे दाखवत असतानाच गब्बरसिंगाच्या डोळ्यांत धूळ टाकून पारडे आपल्या बाजूस वळवतो व पाहता पाहता जय आणि वीरू गब्बरसिंगाला पळवून लावतात. परंतु या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकुरावर चिडतो. तेव्हा ठाकूरठाकुर गब्बरसिंगाने आपले हात छाटल्याचे उघड करतो. जय-वीरू यांच्या मनांत ठाकुराबद्दलचा आदर दुणावतो.
 
===गावातील आयुष्य===
ओळ ५७:
चार साथीदारांची कलेवरे व त्यासोबत धाडलेल्या धमकीमुळे गब्बरसिंग अतिशय संतापतो. एके दिवशी बसंती तळ्याकाठी बसली असताना डाकू तिच्यावर हल्ला करतात. बसंती तेथून पळ काढते. वीरू तिच्या मदतीला धावतो; परंतु ते दोघेही गब्बरसिंगाच्या ताब्यात सापडतात. गब्बरसिंग वीरूला ओलीस धरून बसंतीला सर्वांपुढे नाचायला फर्मावतो. सर्वजण नृत्य पाहताना गुंगले असताना जय एकट्याने आक्रमण करतो व गब्बरसिंगाला गोळीच्या टप्प्यात पकडतो. गब्बरसिंगाला वीरू व बसंती या दोघांना सोडावे लागते. जय, वीरू व बसंती तिघेही गब्बरसिंगाच्या साथीदारांचा सामना करत गोळ्या चुकवत पुलापाशी पोचतात व दरम्यान त्यांचाकडील गोळ्यादेखील संपत आलेल्या असतात. जय जखमी होतो; परंतु तो वीरूला तसे कळू देत नाही. जय वीरूला सांगतो, की तो इथेच राहून बचाव सांभाळेल व तोपर्यंत वीरूने गावात जाऊन गोळ्या आणाव्यात. परंतु वीरू त्याला एकट्याला सोडून जाण्याचे नाकारतो. जय-वीरू यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होतो व पुन्हा एकदा ते नाणेफेक करतात. त्यात जय जिंकतो. वीरू व बसंती गावात जातात. जय जखमी अवस्थेतही गब्बरसिंगाच्या साथीदारांना थोपवून धरतो. त्यांचा कायमचा बंदोबस्त तो पुलाखाली न फुटलेला बाँब फोडून करतो. गब्बरसिंगाचे बहुसंख्य साथीदार या स्फोटात मारले जातात. जय गंभीर रित्या जखमी होतो.
 
वीरू व गावातील अनेक साथीदार तोवर येतात. पण जय अखेरचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. चिडलेला वीरू गब्बरसिंगावर चालून जातो व गब्बरसिंगाचे उरलेले साथीदार लोळवून गब्बरसिंगाला मार-मार मारतो. तो गब्बरसिंगाला जिवानिशी मारणार, इतक्यात ठाकूरठाकुर दिलेल्या वचनाची आठवण करून देतो व गब्बरसिंगाला त्याच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतो. जयाने दिलेल्या वचनाखातर वीरू गब्बरसिंगाला ठाकुराच्या हवाली करतो. ठाकूरठाकुर हात नसले, तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरसिंगाला पुन्हा मार मार मारतो व शेवटी पोलीस येऊन हस्तक्षेप करतात व गब्बरसिंगाला अटक करतात.
 
चित्रपटाच्या शेवटी जयाच्या चितेला अग्नीअग्नि देऊन वीरू एकटा परत चाललेला असतो व त्या वेळेस उद्विग्न वीरूला ठाकूरठाकुर बसंतीचा हात देतात व दु:खी वीरूचे हास्य परत येते.
 
== भूमिका ==
ओळ ७४:
| [[अमिताभ बच्चन]]
|-
| ठाकूरठाकुर बलदेवसिंग
| [[संजीव कुमार]]
|-