"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेबांनी]] एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे '''‘ धम्म ’''' . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. [[अंधश्रद्धा|अंधश्रद्धांवर]] आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ''' ‘ धम्म ’ '''असं आहे.
[[भारत|भारताच्या]] [[राष्ट्रपतीं|राष्ट्रपतींच्या]] खुर्चीवर '''"धम्म चक्र प्रवर्तनाय" ''' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे. याचा मूळ हेतू हाच की [[भारत]] एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची]] आंतरिक इच्छा होती.
|