"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:파니파트
छोNo edit summary
ओळ ६:
 
 
या शहराचे संदर्भ [[महाभारत|महाभारतात]] आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना [[यमुना नदी|यमुनेच्या]] पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते ''पांडुप्रस्थ'' तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
 
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
 
[[पानिपतची पहिली लढाई|पानिपतचे पहिले युद्ध]] १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान [[इब्राहिम लोधी]] आणि [[बाबर]] मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
 
[[पानिपतची दुसरी लढाई|पानिपतचे दुसरे युद्ध]] १५५६ मध्ये [[हेमचंद्र विक्रमादित्य|हेमू]] आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
 
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] बुधवार, [[जानेवारी १५|१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ"]] आणि अफगाण घुसखोर[[अहमदशाह अब्दाली|अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
 
== इतर ==
ओळ २०:
 
== हेसुद्धा पहा ==
लेखक [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, (कादंबरी)|पानिपत]] नावाची एक [[कादंबरी|कादंबरीही]] प्रसिद्ध आहे.
 
[[वर्ग:हरियाणामधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पानिपत" पासून हुडकले