'''मीरा कुमार''' (जन्म: [[मार्च ३१]],[[इ.स. १९४५|१९४५]]) या भारत देशातील राजकारणी आहेत.[[जून]] [[इ.स. २००९]] पासून त्या १५ व्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा व्हायचा मान त्यांना मिळाला आहे.सर्वप्रथम त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून [[इ.स. १९८५|१९८५]] मध्ये पोटनिवडणुकीतून [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[बिजनोर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या [[इ.स. १९९६|१९९६]] आणि [[इ.स. १९९८|१९९८]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[दिल्ली]] राज्यातील [[करोल बाग]] लोकसभा मतदारसंघातून तर [[इ.स. २००४|२००४]] आणि [[इ.स. २००९|२००९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[बिहार]] राज्यातील [[सासाराम]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.