"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन [[जयपूर|जयपूरमधून]] आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरातील आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली, तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. परिणामी, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर, इ.स. १९९६ रोजी जयपूरमध्ये दैनिक भास्करच्या तब्बल १,७२,३४७ प्रती खपल्या{{संदर्भ हवा}}. त्या शहरातील 'राजस्थान पत्रिका' या आघाडीच्या वृत्तपत्राचा खप त्या काळी मात्र एक लाख प्रती इतका होता. त्याहून जास्त प्रती खपवण्याचा नवा उच्चांक दैनिक भास्करने प्रस्थापित केला.
 
त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची आदी शहरांतून निघतात. २०१०-११ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांतून दिव्य मराठी या नावाखाली भास्कर निघू लागले. एसेल ग्रुपच्या सहभागाने दैनिक भास्कर मुंबई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांमधून भास्कर गटाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनए या नावाखाली निघते.
 
दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी १२ राज्यांतून आणि ६४ शहरांतून होणारा रोजचा खप ३५ लाख प्रतींच्या वर आहे(सन २०११).